शुक्रवार, २९ जून, २०१८

प्रदुषण एक गंभीर समस्या


    प्रदुषण एक गंभीर समस्या         

                                    
प्रस्तावना
वातावरणात पाण्यात किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण हे अनेक वेळा असते. उत्सव ध्वनी प्रदूषण , मृदा प्रदूषण , जलप्रदूषण , वायू प्रदूषण आदींचा समावेश होता. प्रदूषण राज्य मोठ्या प्रमाणात झाडे लावायचे आहे. वातावरणात पाण्यात , हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.    
म्हणजे प्रदूषण जीवन नष्ट इतर संयोजना शकतील अथवा विस्कळीत इतर संयोजना शकतील असे करीता वातावरण , जल , आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ , हवेमध्ये डीझेल किंवा इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. ओझोन वायू थराला हानी पोहचून सूर्यापासून बाहेर जाणारी अतिउच्च किरण पृथ्वीवर नको असताना पोहचत आहे. आजचा पर्यावरणाचा हर्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तपमान वाढ , जागतिक तापमानवाढ , उश्माघात सारखे धोके निर्माण होतात.           
प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे  : -
अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण , 
·       अशुद्ध हवा म्हणजे हवा प्रदूषण , 
·     मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण
· सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.
·    हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते. मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढते,
 प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमान वाढ, Global Warming सारखे धोके निर्माण होतात.
भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शास्त्रीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील १० मायक्रोमीटर पेक्षा लहान कणांत २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण ७० टक्यांपेक्षाही जास्त आहे. हे प्रमाण दोन तीन दशकांपूर्वी ५ टक्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असूनदिल्ली, कानपूर, पुणे, बंगलोर ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी ५० पीपीएम इतकी आहे. परंतु वर नमूद केलेल्या शहरात जवळपास वर्षातील सर्वच ३६५ दिवस ही मर्यादा ५० पीपीएम पेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. नायट्रोजन ऑक्साईड, व्ही.ओ.सी.  ओझोनवर भारतातील शहरातून फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर यांचे प्रमाण वाढणे अपरिहार्य आहे. यावरून भारतातील नागरिक अत्यंत घातक हवा श्वसन करत आहेत हे लक्षात येते. याचा परिणाम एकूणच सामाजिक आरोग्यावर होत आहे. डॉक्टरांकडे येत असलेली सर्दी, ताप, पडसे, दमा इत्यादी तक्रारींकरितार वाढलेली गर्दी हे याचे प्रतीक आहे. हे रोग अतिघातक नसले तरी सातत्याच्या प्रादुर्भावाने माणसाची शारीरिक व मानसिक क्षमता कमी करण्यात हातभार लावतात.
ऋणनिर्देश :
“ प्रदूषण एक गंभीर समस्या ” हा माझा विषय आहे ,महाराष्ट्र उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे आम्ही सर्व आभारी आहोत ,करण त्यांनी २०१६ २०१७ ह्या शेक्षणिक वर्षापासून आम्हा सर्वं ११वि आणि 12 वि च्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय आमलात आणला ,वेगवेगळ्या प्रकाशनातील “पर्यावरण –शिक्षण “पुस्तक बोर्डाने मंजूर केले .या पुस्तकाना विध्यार्थ्यांनी व प्राध्यापक वर्गांनी उदंड प्रतिसाद दिला .यामुळे आपले आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकलो ,तसेच आम्हाला शाळेतील पर्यावरण ह्या विषयाची ओळख आम्हाला कऋण दिली त्या बद्दल ,तसेच हा विषय तयार करून देण्यात माझ्या वर्ग विषय  शिक्षिका यांचे मला म्हत्वाचे अनमोल सहकार्य मिळाले तसेच माझ्या मित्रांनी/माय्त्रीनिनी ,पालकांनी ,सहकार्य दिले ,पर्यावरण विषयाची ओळख मला या माध्यमातून करून दिली त्याबद्दल ,
           तसेच आम्हाला 11 वी आणि  12 वि या नवीन वर्षाचे पर्यावरण पुस्तकाचे आणि त्याच्या बरोबर प्रायोगिक भूगोल इयत्ता 12 वि या पुस्तकाचे सहकार्य मिळाले .विशेष आभार मानायचे तर ते ,आमच्या शाळेच्या प्राध्यापकाचे तसेच प्रच्याय श्री आर.बी.पाटील सरांचे कारण त्यांच्याच प्रयत्नांनी आम्हा सर्व मुलाना पर्यावरण विषय करण्यास संधी देऊन ,आम्हा सर्वांना स्वतःला सिद्ध दाखविण्याची संधी दिली त्या बद्दल फार आभार .
मला या प्रकल्पासाठी माझ्या सरांनी श्री. ए.डी.पाटील यांनी तसेच माझ्या शाळेतील इतर सरांनी या प्रकल्पासाठी मला आवश्यक मदत केली ,तसेच या प्रक्ल्पास्ठी माझ्या मित्रांनी जी मदत केली त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो . या प्रकल्पा साठी मला माझ्या सरांनी अनेक म्हत्वाची प्रदुशनाव्रील पुस्तके मला अभ्यासासाठी दिली त्या बद्दल मी त्य्यांचा ऋणी आहे.
उद्दिष्टे :
या प्रकल्पा मागील माझे उद्दिष्ट्ये असे आहे कि , या जगामध्ये अनेक प्रकारचे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे, ज्या मुळे पर्यावरणावर खूप माओठ्या प्रमाणावर दुशीत परिणाम होत आहे , वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी. परिणामतः जागतिक तापमान वाढ, Global Warming सारखे धोके निर्माण होतात. त्या करिता समाज जागृत करणे ,पर्यावरणाचे महत्व लोकांना पटवून देणे ,पर्यावरणाची सुरक्षा करणे ,या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या धोक्या पासून सावधान करणे असा आहे.
विषयाची निवड :
निसर्गाने आम्हाला जगण्याची पद्धत शिकवली परतू आम्ही निसर्गाच्या विरुद्ध कार्य करीत गेलो,पर्यावरणा कडे दुर्लक्ष केले ,जंगलतोड ,धनी,अनेक केमिकल कारखाने,प्लास्टिक,तसेच वाढत जाणारे सिमेंटची शहरे यामुळेच पर्यावरणात प्रदूषणाचे  खूप मोठे गंभीर असे संकट आज आपल्या पुढे आलेले आहे प्रदूषण विषयी समस्या या शालेय विद्यार्थी याना व्हावे व त्यातून पर्यावरणा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्ह्नुनच मी हा विषय निवडलेला आहे.

विश्लेषण –
निसर्गाने आम्हाला जगण्याची पद्धत शिकवली परतू आम्ही निसर्गाच्या विरुद्ध कार्य करीत गेलो,पर्यावरणा कडे दुर्लक्ष केले ,जंगलतोड ,धनी,अनेक केमिकल कारखाने,प्लास्टिक,तसेच वाढत जाणारे सिमेंटची शहरे यामुळेच पर्यावरणाला खूप मोठे जम्भीर असे संकट आज आपल्या पुढे आलेले आहे म्ह्नुनच मी हा विषय निवडलेला आहे.
प्रदूषण म्‍हणजे घातक दूषित किंवा तत्‍सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्‍यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्‍मक ठरतात, तिला प्रदूषण म्‍हणतात.
पृथ्वीच्या पर्यावरणात अनेक प्रकारच्या भौतिक, रासायनिक व जैव क्रिया-प्रक्रिया घडून येत असतात. विविध प्रकारचे जीवसमूह व मानव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते घेऊन राहत असतात. त्यांच्या चयापचयी उत्सर्गामुळे (शरीरात घडून येणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून निर्माण झालेल्या व शरीराबाहेर टाकल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे) बरीच घाण निर्माण होते व हळूहळू सर्व परिसर दुर्गंधीयुक्त व दूषित होतो. सुदैवाने इतर प्रकारच्या सजीवांच्या काही जाती या नैसर्गिक अपशिष्टांचा स्वपोषणासाठी उपयोग करून घेतात व थोड्याफार प्रमाणात परिसर शुद्ध राखण्यास मदत करतात. बरीच घाण पाण्याबरोबर वाहून जाते. अशा रीतीने परिसरात मोठ्या प्रमाणात फेरबदल घडून येत नाहीत व जीवनचक्र अव्याहतपणे चालू राहते. अठराव्या शतकापासून मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. मानवाकडून परिसरात ढवळाढवळ केली जात आहे; प्रचंड प्रमाणावर जंगलांचा विनाश होत आहे; लोकसंख्या भयानक त्वरेने वाढत आहे; उद्योगधंदे झपाट्याने वाढत आहेत. खनिज इंधनांच्या व अणु-ऊर्जेच्या साहाय्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचे विविध प्रकारच्या वस्तूंत, यंत्रांत, उपकरणांत रूपांतर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. जगात अग्रेसरत्व मिळविण्यासाठी प्रगत राष्ट्रांत चुरस निर्माण झाली आहे. यासाठी औद्योगिक उत्पादन वाढविणे हा एकच मार्ग त्यांनी अवलंबिला आहे. वाढत्या औद्यिगिकीकरणामुळे शहरांची संख्या व विस्तार वाढत आहे. त्याबरोबरच मोटारींची व अनेक प्रकारच्या वाहनांची संख्याही वाढत आहे. अधिक धान्योत्पादनासाठी व ते धान्य टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या सर्व मानवी व्यवहारांमुळे घातक व रोगमूलक द्रव्यांचे असंख्य कण नद्यांत, महासागरांत, जमिनीत व वातावरणात विखुरले जात आहेत. हे कण पृथ्वीच्या परिसरातील नेहमीचे घटक नसतात; ते उपद्रवकारक प्रदूषकांचे (परिसर प्रदूषित करणाऱ्या द्रव्यांचे) असतात. आधुनिक युगात पर्यावरणी प्रदूषणात्मक ज्या कठीण समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचा उगम अशा प्रकारे वाढत्या लोकसंख्येत, शहरांच्या वाढत्या संख्येत व विस्तारात आणि तंत्रविज्ञानाच्या वाढत्या उपयोजनात आढळतो.
निरीक्षण -
प्रदूषणाचे मूलघटक : पर्यावरणात मुख्यत्वेकरून शिरणारी प्रदूषके म्हणजे ज्वलनक्रियेमुळे निर्माण झालेले पदार्थ, मानवी उत्सर्ग (मलमूत्र), निःश्वासित केलेले वायू, निरनिराळ्या वस्तूंचे सूक्ष्म धूलिकण, विकृतिकारक सूक्षजीव, विविध पदार्थांचे बाष्प कण, निरनिराळे विषारी वायू, विविध उद्योगांत वापरलेले विद्रावक (विरघळणारे पदार्थ), कृषिकार्यासाठी वापरलेली खते व कीटकनाशके ही होत. त्यांच्या जोडीला तापमानाच्या अतिरेकी सीमा, अवरक्त प्रारण (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग; प्रारण म्हणजे तरंगरूपी ऊर्जा), जंबुपार प्रारण (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग) आणि क्वचित प्रसंगी तीव्र दृश्य प्रारण, आयनीकारक प्रारण (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणारे प्रारण) किरणोत्सर्गी समस्थानिकांनी (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या भेदक किरण बाहेर टाकणाऱ्या प्रकारांनी) बाहेर टाकलेले प्रारण, गोंगाट (अप्रिय आवाज), परा-उच्च कंप्रतेचे ध्वनी(प्रतिसेकंदास होणाऱ्या कंपनांची किंवा आवर्तनांची संख्या अतिशय उच्च असलेले ध्वनी) आणि विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मतरंगलांबीचे विद्युत् चुंबकीय प्रारण यांसारखे अनिष्ट घटक पर्यावरणात प्रदूषक म्हणून प्रवेश करतात. स्थलकालानुरूप ह्या भौतिक, रासायनिक व जैव घटकांचे प्रमाण व उपद्रव सह्य मर्यादांबाहेर गेल्यास प्रदूषण उद्‍भवते.मानवाने अवलंबिलेल्या औद्योगिकीकरणामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सहा लक्ष टन अँटिमनी, तितकेच आर्सेनिक, दहा लक्ष टन कोबाल्ट, आठ लक्ष टन निकेल यांसारख्या विषारी मूलद्रव्यांचे कण वातावरणात विखुरले गेले आहेत आणि कोळसा, खनिज तेल व इतर जीवाश्मी (हायड्रोकार्बनयुक्त साठ्यांच्या रूपातील) इंधन जाळल्यामुळे गेल्या शंभर वर्षांत २५,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ३४,००० कोटी टन कार्बन डाय-ऑक्साइड हवेत मिसळला गेला, असा अंदाज करण्यात आलेला आहे. जंगलांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतो; पण १९५० सालानंतर जगात इमारती लाकडासाठी व इंधनासाठी बेसुमार जंगलतोड होऊन ६६% जंगलांचा विनाश झाला. त्यामुळे ऑक्सिजनाची उपलब्धता कमी झाली. औद्योगिकीकरणाबरोबर शहरांची संख्या व विस्तार वाढला. मोटारींची संख्या वाढली. त्याचबरोबर मोटारींनी बाहेर टाकलेला कार्बन मोनॉक्साइडसारखा विषारी वायू हवेत अधिकाधिक प्रमाणात मिसळू लागला. आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारी अत्याधुनिक स्वनातीत जेट विमाने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापरतात आणि उच्चतर वातावरणात जलबाष्प व कार्बन डाय-ऑक्साइड सोडतात. तेथे जलबाष्पाचे मेघ बनतात आणि या सर्व घटनांमुळे स्थानिक जलवायुमानात (दीर्घ कालीन सरासरी हवामानात) बदल होऊ लागले. १९०० ते १९४० पर्यंतच्या कालावधीत उत्तर गोलार्धाचे सरासरी तापमान ०·° से. इतके वाढले, तर पुढील तीस वर्षांत ते ०·° से. ने कमी झाले, असे आढळून आले. तापमानऱ्हासाच्या अशा प्रवृत्तीमुळे हिमयुगाला प्रारंभ होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 ध्या प्रगत देशांत अनेक वस्तू काही काळ वापरल्यानंतर फेकून देण्यात येतात. त्यांत मुख्यत्वेकरून प्लॅस्टिकची भांडी, पिशव्या, आवरणे, वेष्टने, बाटल्या, टिनचे (कथिलाच्छादित पत्र्याचे) डबे, काचेची तावदाने, व इतर वस्तू आणि कागद यांचा समावेश असतो. थोडेसे नादुरुस्त असलेले दूरचित्रवाणी संच व मोटारगाड्याही फेकून देण्यात येतात. १९६० सालानंतरच्या अंदाजांप्रमाणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये प्रतिवर्षी ६,००० कोटी टिनचे डबे, ,००० कोटी बाटल्याव बरण्या, ४० लाख टन वजनाच्या प्लॅस्टिकच्या वस्तू, एक कोटी टन वजनाच्या लोखंड व पोलादाच्या वस्तू, ८० लक्ष दूरचित्रवाणी संच, ७० लक्ष ट्रक व मोटारगाड्या, ३ कोटी टन कागद व कागदी वस्तू त्याज्य म्हणून फेकून दिल्या जातात. शेतकी उद्योगातील २२८ कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, खनिज उद्योगांतून १७० कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, औद्योगिक प्रकल्पांतून बाहेर फेकलेले ११ कोटी टन वजनाचे पदार्थ, शहरी वस्त्यांतून साचणारा २५ कोटी टन वजनाचा कचरा व इतर त्याज्य पदार्थ एकत्रित केले जाऊन शहरांबाहेर टाकण्यात येतात. ह्या टाकाऊ वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर घाण पसरते व प्रदूषण उद्‍भवते. त्यातून उपद्रवी कीटक निर्माण होतात व वनस्पतींचा संहार होतो. अनेकदा टायरसारख्या निरुपयोगी रबराच्या वस्तू, कचरा, कागद वगैरे जाळण्यात येतात व राख नद्यांत किंवा समुद्रात फेकून देण्यात येते. त्यामुळे वातावरणीय व जलीय प्रदूषणाची आपत्ती ओढवते.
 अणुस्फोटांमुळे निर्माण झालेले व अणुकेंद्रीय विक्रियकांतून (अणुभट्ट्यांतून) अभावितपणे वा अपघाताने निघालेले किरणोत्सर्गी कण आसमंतात विखुरले जातात. शेतातील पिकांवर, दुभत्या जनावरांच्या चाऱ्यावर, वनस्पतींवर, पाण्यावर व हवेत त्यांने अतिक्रमण होते. त्यामुळे परिणामी एक विषारी व प्राणघातक अन्नश्रृंखला [ परिस्थितिविज्ञान] निर्माण होते. पिकांवर फवारलेल्या कीटकनाशकांचाही स्वल्प अंश ह्या अन्नश्रृंखलेत शिरतो. प्रदूषणाचे हे परिणाम फारच गंभीर स्वरूपाचे असतात.
 बहुतेक सर्व प्रकारचे प्रदूषण औद्योगिक अपशिष्टांमुळे उद्‍भवते. या अपशिष्टांवर जर ती जेथे निर्माण होतात तेथेच नीट नियंत्रण ठेवले व ती निर्धोक केली, तर पर्यावरणी प्रदूषणाची गंभीर समस्या बऱ्याच अंशी सोडविली जाऊ शकते.
प्रदूषणाचे प्रकार
  • सागर - सांडपाणी सोडणे, आण्विक कचरा सागरतळाशी सोडणे
  • जमीन - जमिनीत शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर तसेव कचरा पुरणे.
  • वातावरण - धूर व औद्योगिक वायु सोडणे
  • ध्वनीप्रदूषण - मोठा आवाज
  • इ-कचरा - जुन्या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या उपकररा
  • रासायनिक खतांचा भरपूर प्रमाणात होत असलेला वापर
  • वाढत्या अमर्यादित औद्योगीकरनामुळे व नागरीकरणामुळे प्रदूषणाची भयंकर समस्या वाढत आहे
  • गंभीर प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्‍याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्‍हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.
  • प्रदूषणाचे काही स्‍त्रोत, उदा. आण्विक उर्जा संयंत्रे किंवा तेलाच्‍या टाक्‍या ह्यांना अपघात घडल्‍यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते.
  • आणखी काही सर्वसामान्‍य प्रकारच्‍या प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये क्‍लोरिनेटेड हायड्रोकार्बन्‍स् (CFH), शिशासारखे अवजड घातू (उदा. लेड पेंट व आत्तापर्यंतचे पेट्रोल), कॅडमियम (रीचार्जेबल बॅटरीमधील), क्रोमियम, जस्‍त, आर्सेनिक आणि बेंझिन यांचा समावेश आहे.
  • प्रदूषण हा बहुतेक नैसर्गिक आपत्तींचा एक गंभीर दुष्‍परिणाम देखील आहे. उदाहरणार्थ जोराचे चक्रीवादळ झाल्यास सांडपाण्याचे प्रदूषण आणि उलटलेल्‍या नौका, वाहने किंवा किनारपट्टीय तेल-शुद्धीकरण प्रकल्पांपासून होणारे पेट्रोकेमिकल प्रदूषण होऊ शकते.
उपाय / सूचना :
जगात दरवर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, माती, डोंगरदर्‍या, जंगल, त्यातील प्राणी वनस्पती, सूक्ष्मजीव, कीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, समुद्र, नद्या त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने त्यामुळे होणारे प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.
जुन्या व वापरलेल्या बॅटरीच्या जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदीखाली भारत सरकारने शिशाच्या आम्लयुक्त बॅटरी व्यवस्थापन व हाताळण्यासाठीचे नियम २००१मध्ये प्रसिद्ध केले आहेत.  ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे., लाउडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करा
आपल्या देशात शहरीकरण, औद्योगिकरण, कारखानदारी आदी कारणामुळे जंगलतोड होत आहे.अशाप्रकारच्या जंगलतोडीमुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तसेच, कारखान्याचे रासायनिक दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. यामुळे प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ठिकठिकाणी झाडे-झुडपे तोडणे आणि त्या मोकळ्या जागी आपले कारखाने किंवा टोलेजंग घरे बांधतात. यामुळे हवा, ध्वनी, जल प्रदूषण यांसारखे अनेक प्रकारची प्रदूषणे होत आहेत. खराब झालेले पाणी नाल्यांद्वारे सोडून दिले जाते. या सर्व बाबींना माणूस हाच कारणीभूत आहे. अशाप्रकारे प्रदूषण होत गेले तर मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे.जल प्रदुषण एक मानवनिर्मित समस्या आहे
जगभरातील साधारण २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणच्या विविध पद्धती उपयोगी पडतात.
जल प्रदुषण थांबवणे,
औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सुचना करणे, रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.
सेंद्रिय शेतीचा वापर करणे. रासायनिक खते, किटकनाशके मर्यादित वापरणे.
शेडूमातीच्या मुर्ती आणि नैसर्गिक रंग वापरुन सणांचा सात्विक आनंद लुटणे, जलप्रदुषण करणे टाळणे,
पाणी उकळवून आणि त्यामध्ये तुरटी फिरवून पाणी पिणे.
कारखान्याचा दुषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडावेत.
 अशुद्ध पाणी निर्मिती कमीतकमी प्रमाणात होईल याची काळजी घ्वावी.
घरगुती अशुद्ध पाण्याचे स्रोत योग्य ती प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडावे.
निष्कर्ष :
पृथ्वीवरील आरोग्य , मानव आणि इतर प्राणी ज्यामध्ये पर्यावरण (इतर) राहते, विविध पर्यावरणीय संवर्तन होते. सजीवांची एका जातीची प्रजोत्पादना (अपशिष्ट) ही तुमची जात आहे. अशा परस्परावलंबना पर्यावरण पर्यावरण सातत्य टिकून राहतात ; सध्या च्या च्या च्या च्या. विविध घटकांचे संतुलन बिघडते आणि पृथ्वीवरील प्राणी व प्राणी यांच्या जीवनाच्या सातत्याला देश निर्माण होतो. अशा क्रिया-प्रक्रियां मूळ पर्यावरण प्रदूषण उद्‍भवते .


५८ टिप्पण्या:

  1. हे खूप छान आहे पण माझी आपणाला विनंती आहे की यामध्ये संशोधन पध्दती आणि संदर्भ सूचीचा समावेश करावा

    उत्तर द्याहटवा
  2. हे खूप छान आहे पण माझी आपणाला विनंती आहे की यामध्ये संशोधन पध्दती आणि संदर्भ सूचीचा समावेश करावा

    उत्तर द्याहटवा
  3. उदयोगाचे पर्यावरण होनारे परिणाम असे ज्या उदयोगसमुहांमुळे होणारे परिणाम प्रकल्प

    उत्तर द्याहटवा
  4. सर खूप मस्त माहिती बस आजून थोडे points mention झाले असते तर बरे झाले असते. धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा

  5. I'm really enjoying the design and layout of your site. It's a very easy on the eyes which makes it much more enjoyable for me to come here and visit more often. Did you hire out a developer to create your theme? Excellent work!volatile corrosion inhibitor

    उत्तर द्याहटवा
  6. प्रत्युत्तरे
    1. सर मला या प्रोजेक्टची आणखी माहिती हवी आहे त्यात सादरीकरण,महत्त्व आणि कार्यपद्धती हे point पाहिजे आहेत.
      Sir please help me 🙏

      हटवा
  7. सर माला जल प्रदूषण विषयी अशिच महित्ती हवी सर कृपया
    तुम्ही थोडीशी कराल का

    उत्तर द्याहटवा
  8. सर मला या प्रोजेक्टची आणखी माहिती हवी आहे त्यात सादरीकरण,महत्त्व आणि कार्यपद्धती हे point पाहिजे आहेत.
    Sir please help me

    उत्तर द्याहटवा
  9. Sir mala zagatik tapman tyavar honare apay v upay ya paryavaran vt project dya plz

    उत्तर द्याहटवा
  10. खूप छान मार्गदर्शन व शालेय विद्यार्थी साठी उपयोगी प्रकल्प लेखन करिता शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  11. अतिशय सुंदर महत्त्वपूर्ण माहिती

    उत्तर द्याहटवा
  12. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती

    उत्तर द्याहटवा
  13. अतिशय सुंदर महत्त्वपूर्ण माहिती सर

    उत्तर द्याहटवा

प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार- Pollution and Types of Pollution

                  प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार   प्रस्तावना – प्रदूषण म्हणजे   जीवन   नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक...