“प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम”
प्रस्तावना :
विषयाचे महत्व :
स्वस्तात मिळत असल्याने व
जवळच याची निर्मिती होत असल्यामुळे दिवसेंदिवस
प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल जागतिक पातळीवर घसरत म्हणजेच बिघडत आहे.शासनाने
प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यावर सुद्धा काही व्यापारी वर्ग बिनदिक्कत पणे
याचा वापर करताना आपल्याला दिसून येत आहे. सना सुदिच्या वेळी व्यापारी आपला
माल,वस्तूत्याच प्रमाणे खाद्य पदार्थांची पॅकींग
विशिष्ट व सर्व वातावरण सहन करण्याऱ्या सिलबंद प्लास्टीक पिशव्यात केली जाते. या
खाद्य पदार्थांची विक्री सर्वत्र जोमात होवून या पिशव्या प्रत्येक ठिकाणी साचतात.मोकळ्या जागेवर अस्ताव्यस्त पसरल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे
पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याचा परिणाम सभोतालीअसलेल्या परिसरातील लोकांवर
त्याचा गंभीर आजाराचे परिणाम दिसत आहे.
प्लास्टिक वर बंदी घालून याचा कोणताच
फायदा जनतेमध्ये झाला नाही,परंतु फायदा मात्र व्यापाऱ्याचा झाला.कारण प्लास्टिक उत्पादन वाढत असल्याने जास्तीत
जास्त प्रमाणात या प्लास्टिकचा वापर
होतांना दिसत आहे.यांचाह अर्थ प्लास्टिकवर बंदी
घालून पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार नाही. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील व जनते मघ्ये या
विषयी जन जागृती करून प्लास्टिक पासून येणाऱ्या भविष्य काळातील धोक्या विषयी
लोकाना जागृत करणे फार महत्वाचे आहे.
विषयाची निवड :
सदर विषय हा शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील आहे ,हा विषय संकलनासाठी
असल्यामुळे मला माझ्या आवडीचा विषय “ प्लास्टिक पिशव्यांचा
पर्यावरणावर होणारा परिणाम “ पर्यावरण अभ्यासाविषयी विषयी असल्यामुळे मी हा
सेमिनार म्हणून निवडलेला आहे .
विषय निवडीचे उद्दिष्ट्ये
:
सदर
विषय पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित असून त्यातून प्लास्टिक पिश्व्यापासून प्रदुषणाचे विविध घटकांमधील आंतर संबध व्यक्त करण्याचा
प्रयत्न करण्यात आलेला आहे, या विषयाची निवड करताना
पर्यावरण क्षेत्रातील तज्ञाननचा या विषयावरील अभ्यास ,चिकित्सा सर्वांनी अभ्यासली
पाहिजे त्याच प्रमाणे मी “प्लास्टिक पिशव्यांचा
पर्यावरणावर होणारा परिणाम “हा विषय निवडला आहे, या विषया संबधी जागृती यावी व त्याचे पुढील भविष्य कालीन
पिढीला योग्य मार्गदर्शन व्हावे जेणे करून विकासा संबधी प्रश्नाची उकल करण्यासाठी
तयार असणारे उत्तम नागरिक तयार करणे हे या मागील उद्दिष्ट्ये आहे.
विषयाचे सादरीकरण :
प्लास्टीक वस्तुचा उपयोग हल्लीच्या काळात मोठ्या जोमाने फोफावला आहे.
कोणत्याही ठिकाणी कोणताही समारंभ असो किंवा लग्न सोहळा असो यात मोठ्या प्रमाणात
प्लास्टीक पासून तयार झालेल्या
द्रोण,वाट्या,ग्लास,चापिण्याचे कप,विविध प्रकारचे,जेवणाचे ताट,प्लास्टिक डबे,ईतर
अनेक वस्तू आपल्याला दिसून येतात. अल्प काळासाठी या वस्तूंचा समारभ पुरता उपयोग करुन कुठेही मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी या
वस्तू फेकून मोकळे होत असतात. शासनाने ५० मॉयकानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक
पिशव्यांवर बंदी घातली.
मात्र, बहुतांश व्यवसायीक जाडीदार ठिसूळ प्लास्टीक पिशव्यांचा वापर करतात. त्या
अल्प काळातच जमिनीत मुरुन नाहीशा होत आहेत. पण चॉकलेटचे वरचे वेस्टन,अनेक प्रकारचे नमकीन,लहान
मुलांचे बिस्कीट,विविध प्रकारचे मसाला पाऊचमध्ये,तेल देखील पाउच मध्ये,मिळते
त्याचा परिणाम अनेक पदार्थांच्या पॅकींगमध्ये
येत असलेल्या प्लास्टीक पिशव्या मजबूत, टिकावू
व दर्जेदार असल्यामुळे त्या बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. एकदा या पिशवीत
खाद्यपदार्थ भरुन पॅकींग झाल्यावर या पॉकीटमधून थोडीसुद्धा हवा बाहेर निघत नाही.
या खाद्य पदार्थांच्या पॉकीटमधून खाद्यपदार्थ खावून उरलेल्या प्लास्टीक
पिशव्या चालता फिरता कुठेही फेकल्या जातात. त्यामुळे पाळीव आणि मोकाट जनावरे त्या
पिशव्या खावून मोठ्या संख्येने मृत पावल्या आहेत. तर काही प्लास्टीक पिशव्या
सांडपाणी वाहणाऱ्या नालीत साचून अडकून राहिल्याचे दिसून येतात. त्यामुळे
सांडपाण्याचा निचराही होत नाही.
शासनाने प्लास्टीक पिशव्यावर बंदी घातली आहे. परंतु खाद्यपदार्थांच्या
हवाबंद प्लास्टीक पिशव्यांना यातून वगळण्यात आलेले आहे. या खाद्य पदार्थांच्या पिशव्या जागोजागी पसरत असल्यामुळे
गावचा चेहरा-मोहरा बदलत आहे. पूर्वी बऱ्याच वस्तूंची पॅकींग टिकावू दर्जेदार
प्लास्टीक पिशव्यात केली जात होती. मात्र बऱ्याच उत्पादकांनी पॅकींगचे प्लास्टीक
बदलून कागद मिश्रित प्लास्टीकच्या पॉकिटांचा उपयोग सुरू केला आहे. मात्र सध्या
बाजारात व गावागावातील लहान मोठ्या दुकानदाराजवळ खाद्यपदार्थांची विक्री जोमात होत
आहे. मात्र संबंधित विभागाने काही व्यवसायिकांना प्लास्टीक पिशव्यांच्या वापराची
मुभा दिली असल्यामुळे पर्यावरणासह नागरिकांनाही त्रास सहन करावे लागत आहे.
जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचा श्वासच कोंडल्याचे
चित्र आहे.
पर्यावरणावर झालेला परिणाम :
प्लास्टिक वजनाने हलके व वापरण्यासाठी
सोपे झाल्याने लोकांचा कल या कडे जास्त झुकलेला आपल्याला पहावयास मिळतो.नागरिकांना
भाजीपाला घेण्याकरिता आता सोबत कापडी पिशवी नेण्याची सवय राहिली नाही.जो तो,निघतो
सरळ मार्केट मघ्ये जातो हवे ते घेतो व भरपूर प्रमाणात प्लास्टिक आपल्या घरी घेऊन
येतो,त्यानंतर या पिशव्या जेव्हा खाली होतात तेव्हा इतर सर्व मोकळ्या जागेत हवेने
पसरलेल्या आपल्याला दिसतात,काही गटारीच्या मघ्ये जाऊन अडकता.काही गुरे खातात.तर
काही सर्व परिसरामध्ये पसरतात.
जल वाहिन्यामघ्ये अडकून अनेक
जलमार्गउदा.पाईप,ड्रेनेज,गटारी,बंद होतात.अ त्याचा परिणाम पावसाळा सुरु झाल्यानंतर
पाणी या तून पास होतनाही त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये हे घाण पाणी शिरते.नदी
नाल्यांना पूर येतात,नालेच जर या प्लास्टिक मुळे बंद झाले तर पाणी जाणार कोठून,या
पाण्यामुळे परिसरात रोगराईचे प्रमाण वाढते,परिसरात दुर्गंधी पसरते,त्याचा परिणाम
आरोग्यावर होतो.
पावसाच्या पाण्याबरोबर
नदी,नाल्यांच्या मार्गाने सर्व प्लास्टिक हे समुद्रात फेकले जाते.त्यामुळे समुद्रामध्ये
प्लास्टिकचे माहाकाय बेटे निर्माण झाली, जल प्रदूषण झाले,त्यामुळे समुद्रातील अनेक
माशे,जलचरप्राणी आपल्याला नाहीसे झालेली दिसून येतात.जगातील पशू पक्षी त्याच
प्रमाणे गुरे यांच्यावर याचा गंभीर परिणाम झाला.चारा नसल्यामुळे ते प्लास्टिक
पदार्थाला चिटकलेला अन्नधान्य यामुळे प्लास्टिक खातात त्यामुळे अन्नधान्य कमी व
प्लास्टिक जास्त प्रमाणात त्यांच्या पोटात जाते त्यामुळे जनावरांचे आयुष्यमान कमी
झाले व त्यांना वेगवेगळ्या आजारामुळे मृत्युमुखी पडावे लागत आहे.याचा परिणाम असा
झालेला आहेकी,समुद्रामघ्ये प्लास्टिक फार मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला
दिसते,त्याच प्रमाणे जमिनीवर सुद्धा हाच प्रकार आपल्याला बघायला मिळतो.
प्लास्टिक विशव्यांचा वापर हा
लोकांच्या वापराचा अविभाज्य भाग झालेला आहे तो सहजा सहजी बंद होणार नसल्याचे दिसून
येत आहे,किंबहुना पृथ्वी वरील हे प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे.प्लास्टिक हे
मानवाने निर्माण कलेले आहे ते घातक आहे हे त्यास माहिती आहे,परंतु तेच प्लास्टिक
इतर अन्य प्राण्यांची जीवन यात्रा संपवत आहे याकडे मानवाचे लक्ष्यवेधी कधी होणार
हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट
होत नाही. प्लास्टिक पिशव्या या इतक्या पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा
वापर होऊ शकतो.
या पिशव्या २०
मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या
बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणा-या
पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत,
नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो.
असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत.
शिवाय हा कचरा हटवणं ही फार
मोठी कठीण गोष्ट असते. खेरीज प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा इकडून नेऊन दुसरीकडे
टाकला तरी तो नष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे जगात या प्लास्टिक पिशव्यांच्या
कच-याचे ढिग वाढतच आहेत. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा
फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो.
याच प्लास्टिक पिशवीचं विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार र्वष लागतात. खरं तर प्लास्टिक पिशव्यांच्या जन्मापूर्वी मनुष्य इतर प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थाचा आवरण किंवा थैली म्हणून उपयोग करत होता. परंतु प्राणीहत्या व निसर्गाचा नाश थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला तो आजतागायत. तो इतका वाढलाय की जणू त्यानेच आपल्याला विळखा घातलेला आहे.
निष्कर्ष :
प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो, प्लास्टिकचे हे प्रदूषण केवळ भूभागापुरते मर्यादित नसून ते
सागरातही मोठय़ा प्रमाणावर आहे असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. दरवर्षी ८८
लाख टन प्लास्टिक जगातील महासागरांमध्ये येते व त्याचे प्रमाण अंदाजापेक्षा खूपच
जास्त निघाले आहे असे सांगण्यात आले. जॉर्जिया विद्यापीठातील पर्यावरण
अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापक जेना जॅमबेक यांनी हा संशोधन निबंध सादर केला
असून त्यांनी म्हटल्यानुसार सागर किनारी प्रत्येक फुटावर साधारण पाच धान्याची पोती
भरतील इतके प्लास्टिक जगातील किनारपट्टीवर आहे. विकसनशील देश हे या प्लास्टिक
प्रदूषणास जबाबदार असून प्लास्टिकचा हा भस्मासूर रोखला गेला नाही तर इ.स. २०२५
पर्यंत महासागरांमध्ये १७० दशलक्ष टन प्लास्टिक साठेल असा धोक्याचा इशारा देण्यात
आला आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवावं : यासाठी
आज जगात सर्वत्र समाजप्रबोधन केलं जातं. त्याला यशही मिळतं आहे. लोकांनी प्लास्टिक
पिशव्यांचा कमीतकमी वापर करावा यासाठी त्यांना समजावलं जातं. त्यानुसार आज
अनेकांनी या पिशव्या वापरणं कमी किंवा बंद केलेलं आहे. या पिशव्यांचा पुन्हा
पुन्हा वापर कसा करता येईल व तितकाच पर्यावरणाला धोका पोहोचवण्याची वेळ टाळता कशी
येईल हे देखील पाहिलं जातं. तसंच पिशव्या गोळा करून त्यांचं पुनíनमाण करून
त्या पुन्हा वापरात आणल्या जातात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात १ बिलियन टन
इतकं प्लास्टिक निर्माण झालं व आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच हे उत्पादन
पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याची नोंद ‘सायंटिफिक अमेरिकन’
या संशोधन मासिकानं केली आहे.
समारंभात प्लास्टिकच्या
वापर : समारंभ कोणताही असला तरी
प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर हा वेळे पुरता लोक करताना दिसतात वापरा व फेकून द्या
ही वृत्ती आता बंद केली पाहिजे.व लग्न समारंभात कायम टिकणारी
स्टील,पिटली,ताब्याची,भांडीकुंडी वापरायला सुरुवात करायला पाहिजे.
सामाजिक संस्थानी
सहभागघ्यावा : आता अनेक सामाजिक
संस्थाने त्याच प्रमाणे शासन आपल्या स्तरावर
सर्वच देशांमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घातलेली आहे. यामध्ये भारतासह अनेक देशांचा समावेश
आहे. प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी असलेल्या प्रदेशात प्लास्टिकची पिशवी
वापरल्यास दंड आकारला जातो. हा दंड प्रत्येक देशात वेगवेगळा आहे. दंड आकारण्याच्या
नियमानंतर काही देशांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात घट झाल्याचं दिसून आलं.
तसंच यामध्ये पर्यावरणवादी व काही गरसरकारी सामाजिक संस्थानी केलेल्या
लोकप्रबोधनाचाही मोठा वाटा आहे.
प्लास्टिक वापरावर
जास्तीचा कर लावणे : म्हणजे प्लास्टिक पिशवी
वापरायचीच असल्यास ती कर भरून वापरावी. कारण अनेक उद्योग व संस्थांना प्लास्टिक पिशव्यांची
वेष्टन इ.करिता गरज असते. या करामुळे लोकांनी प्लास्टिक पिशवी वापरण्याची गरज का
आहे या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. विनाकारण कर का भरावा म्हणून लोकांनी
मग प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी केला. या उपायामुळेही प्लास्टिक पिशव्यांच्या
वापरात घट झाली.
कापडी /कागदाची पिशवी : आज
आपल्याकडेही छोटी छोटी गावं व शहरं पर्यावरणाचा नाश होऊ नये म्हणून प्लास्टिक
पिशव्यांच्या वापरावर बंदी आणताना दिसत आहेत. त्याजागी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. लोकांनी याला
उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. मॉल, मोठी दुकानं
इ.सारख्या अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशवी हवी असल्यास वेगळी किंमत भरून घ्यावी
लागते. यामुळे त्यांच्या वापराचं प्रमाण निश्चितच कमी झालेलं आहे. ज्यांचं जैविक
विघटन शक्य होतं. अशा पिशव्या वापरण्यासाठी अनेक देशात नागरिकांना प्रोत्साहन दिलं
जात आहे.
जास्त प्रमाणातील
निर्मिती थांबवावी : प्लास्टिक हे जाड
असो की बारीक याचा पर्यावरणावर जो परिणाम होणार आहे तो कोणीही थांबवू शकत नाही या
उलट जे व्यापारी आपले कारखाने रात्रंदिवस चालवून जास्तीचे प्रमाणात प्लास्टिक ची
निर्मिती करतात अशांवर अंकुश लावणे फार म्हत्वाचे आहे.जेणे करून पर्यावरणावर
त्याचा होणारा परिणाम आपण कमी करू शकतो.
आपण
काय करायला पाहिजे : प्रवासाला
जातांना पाणी पिण्या करता प्लास्टिकची बाटली न घेता एखदी स्टीलची बाटली जवळ ठेवावी जेणे करून तीच बाटली आपल्याला पुन्हापुन्हा
प्रवासात कामी येईल.बाजारात जाताना कापडी पिश्विचाच वापर करा.व त्यात वस्तू घेताना
सुद्धा वस्तू ही प्लास्टिक पिशवी मध्ये घेवू नका.जेवणाचे पार्सल घेण्याचे असल्यास
घरूनच एखादी स्टीलचा दबा घेऊन जावा. नारळपाणी, सरबत, थंड पेय पिताना प्लास्टिक
स्ट्रो चा वापर करणे टाळा.मुलांचे शाळेचे डबे घेताना स्टीलचे घ्यावे.कडधान्य खरेदी
वेळी ते सुती बारदान यामध्येच घेण्याचा प्रयत्न करा.व ते धान्य साठवून ठेवण्या
साठी लोखंडी कोठीचा वापर करा. फ्रोजन पदार्थ प्लास्टिकमध्ये पॅक केलेली असतात म्हणून
त्यांचा वापर टाळावा.किचनमध्ये
इतर मसाल्याचे पदार्थ,खाऊ ठेवण्याकरिता स्टील किवां आल्युमिनीअम च्या भांड्यांचा
वापर करावा.घरातील प्लास्टिकच्या बनलेल्या शोभेच्या वस्तून घेता त्यावर पर्यायी व
कायमस्वरूपी टिकणारी स्टील,पितळी,तांब्याची,कांस्य या पासून बनविलेल्या वस्तूंचा
आपल्या घ्रामाघ्ये उपयोग करा.व सर्वात महत्वाचे म्हणजे प्लास्टिक पिशवी पासून
पृथ्वी वरील पर्यावरणाला व त्याच प्रमाणे
परिसराला यापासून होणाऱ्या नुकसानीची लोकाना माहिती द्या जेणे करून जन जागृती होईल
व प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम थांबवन्यास आपला हातभार
लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा