ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का ?
प्रकल्पाची निवड
आज मी जो विषय प्रकल्प निवडीसाठी घेतलेला आहे.त्या विषयाचे नाव आहे ”ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?" असा आहे.
ठिबक सिंचन
प्रणालीचे फायदे.या विषया संदर्भात जमिनीतील असलेले पाणी आपण विहिरीच्या माध्यमातून
शेतातील पिकांना देतो त्याचा परिणाम असा होतो कि, ठिबक सिंचन नसल्यामुळे साधारण
पणे पिकाला लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण ज्यास्त होत असल्याने,शतकरी बांधवाना
पाण्याचे नियोजन करता येत नाही. जमिनीत जो पर्यंत पाणी आहे तो पर्यंत आपण त्याचा
उपभोग घेतो व कालांतराने विहिरीचे पाणी संपते व शेतकरी बांधवाना तेव्हा पाण्याची मोठी
गरज आपली पिके वाचविण्यासाठी लागते त्या वेळेस पाण्याचे महत्व कळते.विहिरीतील पाणी
संपल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही शेतकरी बांधवांना तसेच माझ्या विद्यार्थी
मित्रांना ठिबक सिंचन या विषयी माहिती मिळावी व त्या माहितीच्या आधारे या
प्रकल्पाचे महत्व त्यांना कळावे या करीता सदर विषयाची निवड मी केलेली आहे.
हाच विषय
मला निवडावासा का वाटला ? तर याचे कारण मी असे सांगेल की,भारत हा कृषी प्रधान देश
आहे,व शेती हि पाण्यावर आधारित आहे.जर पाण्याचेच नियोजन नसेल तर,शेतामध्ये काहीही
पिकणार नाही या माझ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याची बचत,त्याच प्रमाणे पिकांना
लागेल तेव्हढेच पाणी,व वर्षभर पाण्याची बचत ठिबक सिंचनाच्या साह्याने शेतकरी
बांधवांनी जर केली तर त्यांचे उत्पन्नात वाढ होईल व शेतकरी राजा सुजलाम सुफलाम
होईल.म्हणून मला हाच विषय माझ्या प्रकल्पा करीता निवडा असे वाटले.
या मागील
माझी प्रेरणा अशी आहे की,आजच्या डिजिटल युगात आपण शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून
जर ठिबक सिंचनाच्या माध्यमाद्वारे आपण जमिनीतील पाणीसाठा वाचवू शकतो जेणे करून
विहिरीतील पाण्याची बचत होवून वाचवलेल्या पाण्याने बाकीची जमीन आपण सिंचनाखाली
आणून जमिनीची सुपीकता व त्यातील ओलीताचा भाग वाढवू शकतो त्यामुळे वर्षभर पाण्याची
बचत करूशकतो.त्याच प्रमाणे जमीन सिंचित करून पिकांची वाढ जोमात होते व जितके पाणी
या पिकांना आवश्यक आहे तेव्हढेच पाणी ठिबक शिन्च्नाच्या माध्यमातून आपल्याला
पिकांना देता येते.याचा फायदा आपल्याला शेतकरी बांधवाना असा होतो की, त्यांच्या
पिकवलेल्या परिपक्व धान्याला भाव चांगला मिळेल.म्हणून मला हा विषय माझ्या प्रकल्पा
करीता घ्यावासा वाटला.
उद्दिष्ट्ये –
1) ठिबक सिंचन पद्धतीमध्ये ३० ते ६० टक्के विहिरीतील पाण्याची बचत करू शकतो,त्याच प्रमाणे मिळणार्या उत्पादनात ३० टक्क्यापर्यंत वाढ करू शकतो. ठिबक सिंचन केल्याने जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली जाते,त्यामुळे उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर ठिबक सिंचनची योजना करता येते. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.
2) गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे विदर्भ,मराठवाडा या ठिकाणचे शेतकरी अडचणीत आहे.त्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे,जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेनदिवस खालावत जात आहे,त्यामुळे विहिरीतल पाणी साठा लवकर संपत असतो,म्हणूनच शेतकरी बांधवांनी आता ठीबक सिंचन योजनेच्या माघ्यमातून आपल्या पाण्याची बचत करणे,व शासनाने सुद्धा या योजने करीता ५ टक्के अनुदान देत आहे.व शासन ठिबक सिंचन हे बंधन कारक करीत असल्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होत आहे.
3) ठिबक सिंचन योजनेचा अभ्यास करीत असतांना असे दिसून आले की,पाण्याची बचत करणारी आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवणारी सर्वात चांगली सिंचन योजना कोणती असे विचारले तर ठिबक सिंचन योजनेचाच उल्लेख करावा लागेल; या योजनेचा उपयोग करीत असतांना पण पाईपलाईनमधील गळती, फिल्टरमध्ये अडकलेला कचरा काढणे, गरजेपेक्षा जास्त दाब आणि पाणी देवू नये पाणी देण्याचे वेळापत्रकानुसार पाण्याचे नियोजन करावे नाहीतर, अशीचांगली ठिबक सिंचन योजना उपलब्ध असूनही पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. ज्या वेळेस विहिरीतील पाण्याचे प्रमाण कमी होईल अशा परिस्थितीत पिकांमध्ये बदल करावा किंबहुना कमी पाण्यात येणारे भाजीपाल्याची पिके आणि फळपिके यांच्यामध्ये तापमानाच्या चढ-उतारानुसार पाण्याच्या साठ्यात होणारे बदल, पिकांची पाण्याची ताण सहन करण्याची क्षमता आणि जमिनीतील ओलावा यांचा अभ्यास करून पिकांची निवड करावी. जेणे करून ठिबक संचाद्वारे देण्यात येणाऱ्या पाण्याची वीस टक्क्यांपर्यंत कपात करता येते. अशा वेळेस डाळिंब, आंबा, मोसंबीसारखी फळबागा दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहतात.
4) ठिबक सिंचन योजना हि ज्या ठिकाणी फळ बाग आहे किवां केळीची,कपाशीची बाग किवां शेती केली जाते अशा जमिनी मध्ये रुंद व लांब अंतरावरील फळबागा करीता फार उपयोगी ठरलेली आहे.कोकणातील शेती जमीन हि चढ उताराची असल्यामुळे त्याचा फायदा तेथील शेतकरी बांधवाना घेता येत आहे.
5) पाण्याची कमतरता असताना पिकाचे सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना सर्वोत्तम आहे. आवश्यक तेवढेच पाणी पिकाला दिले जाते व पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो.त्यामुळे पाण्याची, विजेची,आणी मजुरांची टंचाईभासत नाही, त्याच प्रमाणे ठिबक सिंचन योजने मुळे होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो पैशाची बचत होते त्याचा फायदा हा शेतकरी बांधवाना होतो.म्हणून ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते.
6) ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून,रात्री सुद्धा आपल्याला शेताला पाणी देता येते त्यामुळे त्यावर होणारा मजुराचा खर्च वाचतो.. या पद्धतीत पाट, बांध ह्यांची गरज नसल्याने जमीन वाया जात नाही, खते व किटकनाशके काही प्रमाणात फवारण्यांतून देता येतात. ही पद्धत भुईमूग, सोयाबीन सूर्यफूल, गहू, कापूस, मका इत्यादींसाठी उपयुक्त आहे. ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करता येते व हंगामातील पाण्याचे व्यवस्थापन क्ल्यामुळे वर्षभर म्हणजेच पौसाल्या पर्यंत विहिरीतील पाण्याची बचत करण्यास मदत होतांना दिसत आहे.
विषयाचे
महत्व
पर्यावरणीय दृष्टीकोनातून
प्रकल्पा मधून ठिबक सिंचन योजनेचा उपयोग केल्यामुळे
जमिनीतील पाण्याचा समतोल राखला जात आहे.त्याचे कारण सिंचन पद्धतीचा वापर,त्यामुळे
पर्यावरणाबाबत महत्वाचे म्हणजे जमिनीतील पाणी साठा सुरक्षित करता
येईल.उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही,त्याच प्रमाणे
ठिबक सिंचना करीता लागणारे पाणी हे नळीच्या साह्याने पिकांना देण्यात येते,त्याचा
फायदा पाणी इतरत्र वाया न्जाता फक्त पिकांच्या बुंध्याला जाते,व पाण्याची नासाडी
होत नाही.पाण्याची बचतच होते.
स्थानिक पातळीवर
परिसरातील लोकाना ठिबक सिंचन मुळे होणारे फायदे कळाले.त्याच
बरोबर ठिबक सिंच्नाश्या माध्यमातून पाण्याचा अतिरिक्त होणारा वापर थांबला,त्यामुळे
पाण्याची बचत करण्यास स्थानिक नागरिक शिकले आता त्यांना आपल्या विहिरीतील
पाण्यावरच पूर्ण हंगामात शेती करता येवू लागली.ठिबक सिंचन मुळे पाण्याची बचत तर
झालीच पण त्यांच्या उत्पादन श्म्तेत वाढ झाली. व संपूर्ण देशात, पाणी व खते ठिबक
सिंचनाच्या सह्याने थेंबा थेंबाने पिकांच्या मुळाशी पाण्याचे नियोजनबद्ध आखणी
करण्यास करण्यास देश पातळीवर या ठिबक
सिंचन योजनेचा स्वीकार झाला.
या माध्यमातून समाजाला व राष्ट्राला
होणारा फायदा असा झाला की,ठिबक सिंचन केल्यामुळे खरच आपण पाणी वाचवू शकतो यांची
शास्वती समाजाला झाली ठिबक सिंचन हि पाण्याच्या दबावाखाली चालणारी यंत्रणा
असल्याने एका बाजूस १८० ते २२० फुटा पर्यंत अगदी बांधा पर्यंत आपण ठीबकच्या नळ्या
आंथरू शकतो.त्यामुळे मजुराचा खर्च कमी झाला फवारणीसाठी किवां खते,कीटकनाशक,इतर
फवारणीचे कामे सुद्धा ठीबकच्या साह्याने करता येऊ लागले. याचा फायदा असा झाला
की,जमिनीची मशागत कमी प्रमाणात झाली,पिकामध्ये होणारे कुरण,गवताची वाढ कमी
प्रमाणात झाली.त्यामुळे मशागतीचा खर्च कमी झाला. ठिबक सिंचन योजनेमुळे पिकांची वाढ
ही निरोगी झाल्याने पिकांवर कीटकनाशक फवारणे चा खर्च कमी झाला.त्यामुळे पर्यावरणात
पाण्यामुळे पसरविले जाणारे केमिकल्स पसरत नाही त्यामुळे पान्यादारे पसरले जाणारे
रोग टाळता येतात.किवां त्याचे प्रमाण कमी करण्यात या ठिबक सिंचनाचा फार मोलाचा
वाटा आहे.
कोणते नुकसान टाळता येईल उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. यासाठी पाणी शक्यतो पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी व संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर देणे संयुक्तिक ठरेल.कारण असे केल्याने पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही व पाणी वाया ण जाता पाण्याची बचत करता येईल.
अभ्यास
पद्धती
सदर प्रकल्प विषय “ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?”
हा सर्वेक्षण संशोधन पद्धतीमध्ये मोडतो,या पद्धतीचा उपयोग करूनच पुढील माहिती
मांडलेली आहे.
जेव्हा आम्ही
सर्वेक्षणासाठी पाहाणी कली असता असे दिसून आले की,शेती करीता पाण्याचे व्यवस्थापन
करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य त्यापिक
पद्धतीची निवड शेतकरी बंधूनी कलेली आहे.पावसाचे, कालव्याचे आणि विहिरीतील पाण्याचे एकमेकांना पूरक होऊल अशा तऱ्हेने
नियोजनाचा वापर करण्यात आलेला दिसला. पाटातील पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या
संवेदनशील अवस्थेतच पाणी देण्यात आले. तसेच विहिरीतील पाण्याच्या पाण्याची
उपलब्धतेनुसार लागवडी साठी पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाणी हे ठिबक
सिंचन या तंत्राचा वापर करण्यात आला.
उपलब्ध
पाण्याच्या जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने सिंचन पद्धत निवडणे
फार महत्त्वाचे आहे. सिंचन पद्धत जर योग्य नसेल तर जास्त दिलेले पाणी पिकाच्या
मुळाच्या खाली झिरपून,तर जातेच तसेच पिकाला दिलेली अन्नद्रव्ये, रासायनिक खतेसुद्धा पाण्याबरोबर झिरपून
जमिनीमध्ये मुळाच्याखाली जातात आणि या अन्नद्रव्याचा पिकाच्या वाढीसाठी काहीच
उपयोग होत नाही. उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षमरित्या उपयोग होण्यासाठी शेतात
येणाऱ्या प्रवाहाची योग्य अशी वितरण व जमिनीचे सपाटीकरण हे फार महत्त्वाचे आहे हे
लक्षात येते.
ठिबक सिंचन म्हणजे काय? – ठिबक सिंचन म्हणजे काळ्या रंगाच्या नळीला तोट्या लावून पाण्याच्या
नळीला प्रेशर देऊन पिकांच्या बुंध्याला तोट्या द्वारे मुळासी थेंब थेंब पाणी
देण्याची पद्धत यालाच ठिबक सिंचन असे म्हणतात.
ठिबक सिंचनचा
शोध कोणी लावला.- ई.स.१९६० मध्ये इस्त्राईल सर शिमचा ब्लास यांनी ठिबक सिंचन या
पद्धतीचा शोध लावला हि काळ्या रंगाची नळी असते त्यांना तोट्या बसविलेल्या
असतात.काला रंग या साठी असतो कार्बन ब्ल्याक लावलेला असतो त्यामुळे उन्हाळ्यात
काळ्या रंगावर सूर्याचां परिणाम होऊ नये म्हणून.
राज्य शासनाने या योजने करीता सबसिडी दिलेली आहे,प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही योजना आपल्या शेतामध्ये राबवावी जेणे करून पाण्याची बचत होईल. पारंपारिक पद्धतीने पिकांना दिले जाणारे पाणी की जे,पिकांना कमी व बेकामी जास्त प्रमाणात वाया जाते.त्यामुळे पाण्याची बचत होत नाही.
निरिक्षणे
ठिबक
सिंचन योजना या महत्वाकांक्षी अभियानामुळे निश्चितच भूजल पातळीत
वाढ होत असून शेतीकरिता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध होत आहे. ठिबक सिंचन मधून सर्व
प्रयत्नांचा परिपाक आज आपल्या समोर पाण्याची वाढलेली पातळी यामुळे दिसत आहे.
जिल्ह्यातील ठिबक सिंचनाच्या कामामुळे या पावसाळ्यात मोठा खंड पडला तरी विहीरीच्या
पाण्यावर एखादे ओलीत शेतकऱ्यांना करता येणे शक्य झाले आहे. त्याचे मुख्य कारण ठिबक
सिंचनामुळे पिकांना आवश्यक असेल तेव्हढेच पाणी दिले जाते त्या मुळे पूर्वी जे
अतिरिक्त पाणी वाहून जायचे त्या पाण्याची या मुळे विहीरीत साठवणूक करण्यामध्ये
म्हणजेच पाण्याची बचत करण्यामध्ये त्याचा फायदा होतांना दिसत आहे.कमी पाणी जरी
असले तरी शेती करता येऊ लागली.शेतकरी उत्पादन प्रक्रियेत पुढे आले व त्यांच्या
आर्थिकदृष्ट्या असलेल्या अडचणी दूर झालेल्या दिसून येतात.
शासनाने ज्या ठिकाणी पाणीसाठा कमी प्रमाणात आहे अशा ठिकाणी शाश्वत
शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणा अंतर्गत
एकात्मिक पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करुन
पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व पिकास संरक्षित
सिंचन देण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यासाठी तसेच टंचाई परिस्थितीवर मात
करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पंच वार्षिक योजनेमध्ये 25 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आलेली आहे.
विश्लेषण
ठिबक सिंचन म्हणजे काय? – ठिबक सिंचन म्हणजे काळ्या रंगाच्या नळीला तोट्या लावून पाण्याच्या
नळीला प्रेशर देऊन पिकांच्या बुंध्याला तोट्या द्वारे मुळासी थेंब थेंब पाणी
देण्याची पद्धत यालाच ठिबक सिंचन असे म्हणतात.
ठिबक सिंचनचा
शोध कोणी लावला.- ई.स.१९६० मध्ये इस्त्राईल सर शिमचा ब्लास यांनी ठिबक सिंचन या
पद्धतीचा शोध लावला हि काळ्या रंगाची नळी असते त्यांना तोट्या बसविलेल्या
असतात.काला रंग या साठी असतो कार्बन ब्ल्याक लावलेला असतो त्यामुळे उन्हाळ्यात
काळ्या रंगावर सूर्याचां परिणाम होऊ नये म्हणून.
राज्य
शासनाने या योजने करीता सबसिडी दिलेली आहे,प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही योजना
आपल्या शेतामध्ये राबवावी जेणे करून पाण्याची बचत होईल. पारंपारिक पद्धतीने
पिकांना दिले जाणारे पाणी की जे,पिकांना कमी व बेकामी जास्त प्रमाणात वाया जाते.त्यामुळे
पाण्याची बचत होत नाही.
पाण्याचे व्यवस्थापन व ठिबक सिंचन पद्धत –
सध्या
पावसाच प्रमाण हे अनियमित व अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर
करणे अत्यावश्यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी वाटपाची कार्यक्षमता कमी आहे
व पाण्याचा अपव्यय सुद्धा जास्त होतो. त्यामुळे ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन
पद्धती वापरणे गरजेचे आहे. जमीन, पाणी व हवा यांची
उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही
जमिनीवर त्याचा अवलंब करता येतो. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता
जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर
कमी होतो.
पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणावरून
पिकांची निवड करणेही आवश्यक आहे. उदा.मक्याच्या पिकाला एकरी 5.5 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते तर
त्याच्या निम्म्या पाण्यात सूर्यफुलाचे पीक येऊ शकते. आपल्याकडे घेतली जाणारी ऊस,
केळी अशांसारखी पिकेही प्रचंड प्रमाणात पाण्याची मागणी करतात.
पाण्याची बचत करायची असेल तर अशा जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपेक्षा कमी पाणी
लागणारी पिके लावणे आणि त्यांचीही दुष्काळी परिस्थितीत तग धरून ठेवणारी वाणे
वापरणे हाच उपाय शिल्लक राहतो. जमिनीतून पाणी शोषणे आणि सेंद्रिय पदार्थांची
निर्मिती म्हणजेच पिकांच्या बाबतीत उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग या गोष्टीची
कार्यक्षमता ठरताना पीक वनस्पतीच्या पानांचे एकूण क्षेत्रफळ, मुळांचा प्रकार आणि संख्या, खोडातील पाणी वहन क्षमता,
पानांवरील पर्णरंध्रांची संख्या, पानांची
प्रकाश ऊर्जा आणि हवेतील कार्बन वायू खेचून घेण्याची क्षमता इत्यादी घटक
महत्त्वाचे असतात. पानांचे एकूण क्षेत्रफळ, खोलवर जाणारी
किंवा उथळ असलेली मुळे यावरूनही कुठल्या पिकाला कमी पाणी लागेल हे ठरवता येते.
निष्कर्ष
ठिबक
सिंचन योजने मुळे खालील फायदे दिसून येतात,या पद्धतीचा उपयोग केल्यामुळे सर्व
पिकांना सारखे पाणी दिले जाते.पाणी इतरत्र वाया जात नाही,पाणी जमिनीला जात नाही ते
फक्त पिकाला दिले जाते,पिकांना ठरविलेल्या वेळापत्रकानुसार नियमित पाणी दिले जाते.त्यामुळे
पिकांची वाढ जोमात होतांना दिसते.
सिंचनामुळे पिकांच्या मुळाच्या
कार्यक्षेत्रात पाणी ,माती,हवामान यांचा समन्वय साधला जातो.पिकांना पाणी कमीत कमी
वेगाने दिल्यामुळे ठिबक सिंचनाच्या या प्रक्रीयेमुळे पिकांची वाढ,त्यांची गुणवत्ता
चांगली दिसून येते,त्याचा परिणाम शेतकरी बांधवाना दर्जेदार पिक उत्पादन घेता येणे
शक्य झालेले आहे.
ठिबक
सिंचनच्या माध्यमातून गर्जे नुसार देण्यात येणारे पाणी दिल्यामुळे पिकामधील किवां
रोपातील हरितद्रव्य तयार करण्याची क्रिया खंडित होत नाही.उत्पादन वाढीची प्रक्रिया
२०ते २०० टक्के पर्यंत जलद गतीने वाढून पाण्याचे पण नियोजन होते व त्या माध्यमातून
पाण्याची बचतच होतांना दिसून येत.
ठिबक
सिंचनामुळे क्षारयुक्त जमिनी मघ्ये याचा चांगला फायदा झालेला आपल्याला दिसून येतो
कारण पारंपारिक पद्धतीने दिलेले पिकांना पाणी यामुळे जमीनित मुरणारे पाणी त्यातून
निर्माण होणारे क्षार हे जमिनी साठी धोकादायक असतात,परंतु ठिबक सिंचनामुळे जमीन
खराब होत नाही उलट, जमिनीत क्षार असल्यावर सुद्धा पिके वाढतात व उत्पादन घेता येऊ
लागले.
कोकणातील
खाली वर असलेल्या जमिनची लेव्हल लागवडी खाली आणता आल्या,कोरड वाहू शेतजमिनीत ठिबक
सिंचनाच्या माध्यमातून पिके घेणे शक्य झाले.यामुळे कोकण किनारपट्टी असलेल्या शेत जमिनीत ठिबक
मुळे पिके घेता आली त्यामुळे तेथील नागरिक फार संतुष्ट झालेले दिसतात.
प्रकल्पाचे सादरीकरण –
विद्यार्थी
मित्रानो प्रकल्पाचे सादरीकरण लिहित असतांना खालील बाबींचा उल्लेख करणे फार
महत्वाचे आहे. ते पुढील प्रमाणे आपण लिहाल अशी अपेक्षा करतो,
प्रकल्पाचा
विषय निवडल्या नंतर सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींची
आवश्यकता भासली
आपण
लिहित असलेला प्रकल्प जर ग्रुप प्रकल्प या स्वरूपाचा असेल तर,या प्रकल्पात
आपल्याला मिळालेल्या ग्रुप सदस्यांनी प्रकल्प पूर्ण होईल तो पर्यंत कोणकोणती जबाबदारी
पार पाडली गे नमूद करावे.
प्रकल्प
लिहित असतांना आपल्याला आलेल्या समस्यांची माहिती आपण आपल्या विषय शिक्षकांनी सदर
प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे माहितीच्या स्वरूपात मार्ग्दर्ष्ण
केले या विषयी थोडीफार माहिती लिहिणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे कोणत्या प्रकारच्या
समस्या आपल्या समोर आल्या या विषयी समस्यांचे निराकरण विषय शिक्षकांनी केले
त्यांच्या विषयी आभार मानायला विसरू नका.?
विषय
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अ आपण मिळविलेल्या माहितीच्या आधारे सर्व बाबींचा
समावेश करून सदर प्रकल्प सादर करण्यात येत आहे हि शेवटची ओळ लिहायला विसरू नका.
प्रकल्प
अहवाल
विद्यार्थी
मित्रानो प्रकल्पाचा अहवाल सादर करणे हा प्रकल्प लेखनाचा अंतिम टप्पा आहे,हा अहवाल
किमान चार पाने असावा या वरूनच बाह्य
परीक्षक आपल्या प्रकल्पाचे मूल्यमापन करीत असतात. एकंदरीत प्रकल्प अहवाल हा
प्रकल्पाचा सारांश असतो या चार पाणी अहवाल लेखनामध्ये प्रकल्प लेखना प्रमाणेच सहा
मुद्दे येतात.ते मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
1
प्रकल्पाचे नाव
आज मी जो विषय प्रकल्प निवडीसाठी घेतलेला
आहे.त्या विषयाचे नाव आहे ”ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का? असा आहे,
ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे.या विषया संदर्भात जमिनीतील असलेले पाणी आपण विहिरीच्या माध्यमातून शेतातील पिकांना देतो त्याचा परिणाम असा होतो कि, ठिबक सिंचन नसल्यामुळे साधारण पणे पिकाला लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण ज्यास्त होत असल्याने,शतकरी बांधवाना पाण्याचे नियोजन करता येत नाही. जमिनीत जो पर्यंत पाणी आहे तो पर्यंत आपण त्याचा उपभोग घेतो व कालांतराने विहिरीचे पाणी संपते व शेतकरी बांधवाना तेव्हा पाण्याची मोठी गरज आपली पिके वाचविण्यासाठी लागते त्या वेळेस पाण्याचे महत्व कळते.विहिरीतील पाणी संपल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही शेतकरी बांधवांना तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांना ठिबक सिंचन या विषयी माहिती मिळावी व त्या माहितीच्या आधारे या प्रकल्पाचे महत्व त्यांना कळावे या करीता सदर विषयाची निवड मी केलेली आहे.
2
उद्दिष्ट्ये
या
ठिबक सिंचन योजनेचा उपयोग केल्याने जमीन, पाणी व
हवा यांची उत्तम सांगड घातली जाते,त्यामुळे उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच
कोणत्याही जमिनीवर ठिबक सिंचनची योजना करता येते. यामधून खते देता येत असल्यामुळे
खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च
मोठ्या प्रमाणावर कमी होतो.हे तंत्र सर्व शेतकरी बंधूनी वापरावे जेणे करून
येणाऱ्या नवीन पिढीला या माध्यमातून पाण्याची बचत कशी करावी हे शिकायला मिळेल.
पाण्याची
कमतरता असताना पिकाचे सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना सर्वोत्तम आहे. आवश्यक तेवढेच पाणी पिकाला दिले जाते व
पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो.त्यामुळे पाण्याची,
विजेची,आणी मजुरांची टंचाईभासत नाही, त्याच प्रमाणे
ठिबक सिंचन योजने मुळे होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो पैशाची बचत होते त्याचा
फायदा हा शेतकरी बांधवाना होतो.म्हणून ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते.
3 अभ्यास
पद्धत
सदर प्रकल्प विषय “ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?”
हा सर्वेक्षण संशोधन पद्धतीमध्ये मोडतो,या पद्धतीचा उपयोग करूनच पुढील माहिती
मांडलेली आहे.
जेव्हा आम्ही
सर्वेक्षणासाठी पाहाणी कली असता असे दिसून आले की,शेती करीता पाण्याचे व्यवस्थापन
करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य पद्धतीची
निवड शेतकरी बंधूनी कलेली आहे.तसेच विहिरीतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवडी साठी
पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाणी हे ठिबक सिंचन या तंत्राचा वापर
करण्यात आला.
या प्रकल्पांचे
सदरीकरण करीत असतांना, संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करताना मला या प्रकल्पासाठी पर्यावरण या विषयात
प्राविण्य मिळविलेले माझ्या क्लास टीचर सौ./श्री. ......................... तसेच माझे विद्यालयाचे प्राचार्य श्री .....सर. यांनी तसेच माझ्या विद्यालयातील इतर सरांनी या प्रकल्पासाठी मला मोलाची मदत हा प्रकल्प बनविण्या करिता केली. पाण्याची बचत करणारी आणि सिंचनाची
कार्यक्षमता वाढवणारी सर्वात चांगली सिंचनप्रणाली कोणती असे विचारले तर ठिबक सिंचन
प्रणालीचाच उल्लेख करावा लागेल. तसेच
या प्रकल्पासाठी माझ्या सोबत असलेल्या ग्रुप मधील ईतर मित्रांनी/ मैत्रिणी
यांनी जी मदत केली त्या सर्वांचे मी या
ठिकाणी आभार मानतो. या प्रकल्पा साठी मला माझ्या सरांनी अनेक म्हत्वाची पर्यावरण
विषयी काही पुस्तके अभ्यासासाठी दिली त्या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
4
निष्कर्ष
औद्योगिकरणाच्या वाढीमुळे त्याच
प्रमाणे वाढणाऱ्या उष्णतेमुळे वातावरणात बदल घडताना आपल्याला दिसून येत आहे,त्या
बदलाचा परिणाम येणाऱ्या भविष्यकाळात पाण्याची कमतरता भासण्याचे संकेत आता पासूनच
आपल्याला दिसू लागलेले आहेत
पावसाळ्यात पडणारा पाउस नेमका
खरिपाच्या हंगामात हुलकावणी देताना दिसत आहे, काही ठिकाणी पाऊस कमी पडतो किंवा
काही भागात तो मुसळधार पडतो. परंतु ठिबक सिंचन योजना अशाच वेळेस महत्वाची मानली
गेली आहे की,कमी प्रमाणात जरी विहिरीला पाणी असले तरी पिण्याच्या पाण्याचा व
शेतीचा या प्रणाली मुळे समतोल राखला जातो.म्हणून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने उपयोग
करून पाण्याची बचत करणे,त्याच प्रमाणे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेणे
गरजेचे आहे.
ठिबक सिंचन करताना पाईपलाईनमधील गळती, फिल्टरमध्ये अडकलेला कचरा, गरजेपेक्षा जास्त दाब आणि पाणी देण्याचे अनियंत्रित वेळापत्रक यांमुळे अशी
चांगली प्रणाली उपलब्ध असूनही पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते.ती दूर केली
पाहिजे.
म्हणून सदर योजनेचा
उपयोग हा पाण्याच्या उपलब्धतेनुसार वापराचे बदल करावे लागतील.त्यामुळे या केलेल्या
नियोजनबद्ध केलेल्या बदलामुळे, उन्हाळ्यात पिकांची पाण्याची ताण सहन करण्याची क्षमता आणि जमिनीतील ओलावा
यांचा अभ्यास करून ठिबक संचाद्वारे देण्यात येणाऱ्या पाण्याची बचत करता येते. जर
नियोजित पाणी देण्याचे तंत्र वापरले नाही तर,पाण्याची बचत होऊ शकत नाही.
पाण्याचे प्रमाण कमी असतांना सुद्धा ठिबक च्या साह्याने ईतर फळ बाग म्हणजेच डाळिंब, आंबा, मोसंबीसारखी पिके ठिबक सिंचनाद्वारे संध्याकाळच्या थंड वेळेत उघड्यावरील भाजी आणि फळपिकांना पाणी दिले तर सिंचनाची कार्यक्षमता वाढू शकते आणि पाण्याच्या पाळ्या कमी होऊन पाण्याची बचत होऊ शकते.
5
उपाययोजना
पाण्याची कमतरता असताना पिकाचे सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचनप्रणाली सर्वोत्तम आहे. आवश्यक तेवढेच पाणी पिकाला
दिले जाते व पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो.पाण्याची टंचाई, विजेची टंचाई आणि मजूरांची टंचाई ह्यावर ठइबक सिंचन शिवाय दुसरा पर्याय
नाही.
महाराष्ट्रातील शेती ही बहुतांशी पावसावर अवलंबून आहे व पावसाचे
प्रमाण हे अनियमित असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे नाही. त्याकरिता
जेवढे पाणी उपलब्ध आहे. त्याचा काटकसरीने व योग्य उपयोग करण्याकरिता शास्त्रोत्क
पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. केवळ पाणी नियोजन करून जमणार नाही
तर पाण्याच्या उपलब्धते नुसार पिकांचे नियोजन करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यंदाच्या जलसंकटाला तोंड देण्यासाठी
उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि कार्यकुशलतेने वापर करून पीक
उत्पादन घेण्याचा आणि भविष्यात वाढणाऱ्या अशा प्रकारच्या संभाव्य संकटाची तिव्रता
कमी करण्याचा प्रत्येक शेतकऱ्याने गांभिर्याने विचार केला पाहिजे. ज्या
शेतकऱ्यांकडे सध्या थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्यांनी आपल्या
अनुभवांप्रमाणे, निवडलेल्या पीक पद्धतीप्रमाणे आणि योजलेल्या
सिंचन प्रणालीप्रमाणे विविध उपायांचा वापर केला तर त्यांच्याकडील पाण्याची पन्नास
टक्क्यांपर्यंत बचत होऊन पीक उत्पादनातील कार्यक्षमता टिकून राहील.
6 संदर्भ
सूची
सबंधित विषयावर माहितीचा आढावा मिळवण्यासाठी
मी व माझ्या मित्रांनी सदर प्रकल्प विषयाचे विभाग प्रमुख तसेच इतर तज्ञ व्यकी
यांचे मार्गदर्शन घेतले.त्याच प्रमाणे ठिबक सिंचन योजना राबवीत असलेले साहेब यांचे
मोलाचे मार्गदर्शन लाभले.वेगवेगळ्या गोष्टीचा वापर केला .आमचे विषय शिक्षक त्याच
प्रमाणे मुख्यध्यापक यांनी आम्हाला आमच्या विषयाची पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली
त्यातील काही माहितीचा आम्ही वापर केला. या माहितीच्या माद्यमातून तसेच
पाठ्यपुस्तकातील आभ्यास्क्मातील पर्यावरण या पुस्तकामधून मोलाची माहिती
मिळाली,तसेच मला या विषया संबंधी विशेष मार्गदर्शन माझ्या शिक्षक वृन्दानी आम्हाला
मोलाची माहिती दिली.त्या बद्दल सर्वांचे आभार.