पर्यावरणावर
होणाऱ्या जैव तंत्रज्ञांनाचा परिणाम
प्रस्तावना :
सांडपाण्यातील
कार्बनी पदार्थांचे विघटन करण्यासाठी आणि घन कार्बनी (उत्सृष्ट) पदार्थांवर
प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी अलीकडील काळात अतिसूक्ष्म
जैवतंत्रज्ञान वापरले जाते. आधुनिक जैवतंत्रज्ञानामध्ये जैव औषध पुनर्निर्मिती (Bio-remediation),
जैव कीटकनाशके (Bio-pesticides), जैवखते (Bio-fertilizer)
आणि पर्यावरणावर लक्ष ठेवणारी जैवसंवेदके (Bio-Sensor) यांचा समावेश होतो...
जैवतंत्रज्ञान
ही आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेची गेल्या काही वर्षांत
झपाट्याने प्रगती झाली असून, ती मानव
जातीला फायदेशीर ठरत आहे. जैवतंत्रज्ञानाने सजीवांमधील जैविक तत्त्वे आणि जैविक
प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. दुधापासून दही, चीजसारखे पदार्थ तयार करणे, किण्वन प्रक्रियेने पाव तयार
करणे किंवा मळीपासून मद्यार्क तयार करणे या सर्व जैवतांत्रिक क्रिया आहेत. मात्र, या पारंपरिक जैवतांत्रिक
क्रिया आधुनिक जैवतंत्रज्ञानात समाविष्ट होत नाहीत. कारण आधुनिक जैवतंत्रज्ञान हे
रेणू पातळीवर आधारलेले आहे. या जैवतंत्रज्ञानाचा वापर विविध रोगांवरील प्रतिजैविके
तयार करण्यासाठी होतो, तसेच
सजीवांमधील आनुवंशिक गुणधर्म बदलण्याचे तंत्रज्ञानसुद्धा आधुनिक जैवतंत्रज्ञानातील
जनुकीय अभियांत्रिकी या शाखेत आहे. त्यामुळे क्रांतीकारी बदल घडवून आणण्याची
क्षमता आधुनिक जैवतंत्रज्ञानात आहे.
विषयाची निवड :
सदर विषय पर्यावरण या शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील आहे , निवडलेल्या विषयाचे नाव “ पर्यावरणावर होणाऱ्या जैव तंत्रज्ञांनाचा परिणाम ‘असे आहे,सदरचा प्रकल्प हा संकलनासाठी या प्रकारात मोडतो ,पर्यावरणाशी संबधित हा विषय माझ्या आवडीचा असल्यामुळे मी हा प्रकल्प निवडलेला आहे.
उद्दिष्ट्य:
विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच प्रचंड प्रमाणात वाढणारे यांत्रिकीकरण, औद्योगीकरण व शीतकरण तंत्रज्ञानाचा वापरातून उत्सर्जित होणारे रासायनिक पदार्थ, विविध प्रकारचे वायू उदा. कार्बन-डाय- ऑक्साजइड, कार्बन मोनॉक्साेईड, क्लो,रोफ्युरो कार्बन (सी.एफ.सी.) इ.मुळे वातावरणाचे नैसर्गिक संतुलन धोक्या्त आले आहे. परिणामी विविध व्याधी, तापमान वाढीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हवामानबदलाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समितीच्या अहवालानुसार 21 व्या शतकाच्या शेवटपर्यंत पृथ्वीच्या उष्णतामानात 2 ते 4.5 अंश से.पर्यंत वाढ होण्याची शक्य ता आहे. त्यामुळे समुद्राची पाणीपातळी सुमारे 18 ते 59 सें. मी.पर्यंत वाढण्याची शक्यनता आहे. त्याचा विपरीत परिणाम कृषी उत्पादनावर झाल्यास अन्नधान्याचा गंभीर प्रश्ने उभा राहील. तेव्हा पर्यावरण संतुलनाकडे लक्ष देणे अत्यावश्यरक आहे.
निष्कर्ष :
सामाजिक व पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे, की कृषी निविष्ठांचा व्यापार करणार्यात बड्या बहुराष्ट्रीय कंपन्याच्या विषयुक्त रसायनांमुळे लोकांचे आरोग्य, जलपुरवठा, परागीकरणाद्वारे पिकांच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपयोगी कीटक व एकूणच पर्यावरण यावर घातक परिणाम झाले आहेत.
मत
/हेतू :
युरोपातील व त्यातही पश्चिकम युरोपातील देशांमध्ये राहणार्याव बहुसंख्य लोकांचे मत जनुकीय संस्कारित पिकांच्या लागवडीच्या व अशा पिकांपासून निर्मिल्या जाणार्या् खाद्य पदार्थांच्या सेवनाच्या विरोधात आहे. याला काही ऐतिहासिक कारणे आहेत. दुसर्याय महायुद्धापर्यंतच्या काळात येथील कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रियांद्वारा तयार होणार्या् नत्राचा उपयोग युद्धासाठी लागणार्याी स्फोटकांच्या निर्मितीसाठी होत होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर या नत्राचा काय उपयोग करावा असा प्रश्नो निर्माण झाला. यातून या नत्राचा उपयोग शेतीसाठी नत्रपुरवठा करण्यासाठी होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर युरोपात व इतरही विकसित देशांमध्ये रासायनिक शेतीची मोठ्या प्रमाणात सुरवात झाली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तिचा येथे सर्वदूर प्रसार झाला. याच काळात येथील शेतीचे यांत्रिकीकरण झाले. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर खूप प्रमाणात वाढला व या शेतीचे एक प्रकारे औद्योगीकरण झाले. शेतीच्या या स्वरूपाला‘औद्योगिक शेती’ (इंडस्ट्रियल अॅएग्रिकल्चर) असे म्हणतात.
विषयाचे
सादरीकरण :
जैवतंत्रज्ञान म्हणजेच जीव, रसायन, सूक्ष्मजीव तसेच अभियांत्रिकी या मधून निर्माण झालेल्या संकल्पना यांचा एकत्रित वापर सूक्ष्मजीव, वनस्पती यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी करणे.जैवतंत्रज्ञानाच्या माहितीची आदान-प्रदान करणे, माहितीचा साठा करणे, यासाठी १९८७ मध्ये जैवतंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानप्रणाली अस्तित्वात आली. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग सर्वच विद्याशाखांमध्ये अभ्यासु लागल्याने जैवतंत्रज्ञान या क्षेत्राच्या माहितीची गरज वाढली. नवीन नवीन तंत्राच्या साहाय्याने माहिती मिळवणे, ती संकलित करणे, ती साठवणे आणि गरज असेल तेव्हा या प्रणालीचा वापर करणे,माहितीचे प्रसारणासाठी जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली उभी करण्यात आली. जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली तयार करणारा भारत हा जगातील पहिलाच आपला देश आहे.
आरोग्य आणि जैवतंत्रज्ञान :
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित झालेल्या नव्या साधनांमुळे आता
एखाद्या व्यक्तीचे आजारपण ठरविण्यात त्या व्यक्तीच्या जनुकांची भूमिका कोणती आहे, हे बघण्याची संधी मिळणार आहे.
याद्वारे मधुमेह आणि हृदयरोग यांचे निदान त्यांची शारीरिक लक्षणे दिसण्यापूर्वीच
करणे शक्य आहे. मूल मातेच्या उदरात असतानाच त्याच्यामध्ये असणाऱ्याने जनुकीय
दोषांचा मागोवा घेणेहीशक्य झाले आहे. त्यासाठी अनेकविध औषधे वापरली जात आहेत. उदा.
मधुमेह या विकारात बाहेरून इन्शुलीन देणे.
मानवी
शरीरातील स्वादुपिंडा या ग्रंथीमध्ये ज्या चार पेशी - अल्फा,गॅमा, बीटा आणी डेल्टा असतात.त्यातील
बीटा या पेशीमध्ये इन्शुलीन हे संप्रेरक तयार त्या मुळे शरीरातील साखरेचे प्रमाण व
अन्नामाधुन मिळालेले इतर पोषकद्रव्यांचायोग्य नियमनाचे कार्य त्यामुळे होत असते.
परंतु मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील बीटा हि पेशी अकार्यक्षम होतांना
दिसून येते.त्यामुळे मानवी शरीरातील इन्सुलिनतयार होण्याची क्रिया मंदावते वत्याचा
परिणाम मधुमेह झालेल्या व्यक्तीस बाहेरून आपल्या शरीरात इन्सुलिन द्यावे लागते कि,ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण
समतल राहून शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.पूर्वी हे इन्शुलीन घोड्यासारख्या
प्राण्यांच्या यकृतापासून मिळविले जात असे.
मात्र, जीवाणूंच्या रचनेत बदल घडवून आणता
येतो आणि असे जीवाणू मानवाला आवश्यक असणारी प्रथिनयुक्त संप्रेरके बनवू शकतात हे
जैवतंत्रज्ञानानाने दाखवून दिलेे आहे.परंतु यामध्ये आता फार बदल झालेला आपणास
दिसून येतो,जसे कि,आज हे तंत्रज्ञान वापरून विविध
रोगांना प्रतिबंध करण्यासाठी तोंडाने घ्यावयाच्या लसी (डोस), इन्शुलीन आणि तत्सम प्रथिनयुक्त
संप्रेरकांवर आधारित बरीचशी औषधे निर्माण केली जात आहेत.
एखाद्या
रोगाविरुद्ध प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘लसीकरण पद्धती’ वापरतात. या लासिकार्नाच्या
माध्यमातून हे सूक्ष्मजीव शरीरामध्ये टोचले जातात. लसीकरणामुळे शरीरात या मृत
किंवा अर्धमृत जीवाणूंना प्रतिकार करणारी प्रथिने तयार होतात. अशी प्रथिने आवश्यक
त्यावेळी वापरली जातात.
जैव
अभियांत्रिकीद्वारे आता जीवाणूंचे किंवा विषाणूंचे जनुकीय गुणधर्म बदलणे शक्य झाले
आहे. जनुकीय गुणधर्म बदललेले जीवाणू किंवा विषाणू रोगाला प्रतिकार करणारी प्रथिने
मोठ्या प्रमाणावर तयार करू शकतात. त्यामुळे अलीकडेरोगाला प्रतिबंध करण्यासाठी
अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू न टोचता जीवाणूंनी तयार केलेली शुद्ध स्वरूपातील
प्रथिने शरीरात टोचली जातात. ही प्रथिने रोगाविरुद्धची प्रतिकारक शक्ती
कार्यान्वित करून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात. उदा. हिपॅटिटीस बी. (Hepatitis B
Virus - HBV) विषाणूची कावीळ प्रतिबंधक लस. या प्रकारच्या लसीमध्ये
विषाणू किंवा जीवाणू शरीरामध्ये टोचले जात नाहीत. हा या पद्धतीचा मोठा फायदा आहे.
अशा प्रकारे जीवाणूंनी तयार केलेली प्रतिकारी प्रथिने टोचल्यामुळे प्रतिकारक शक्ती
यंत्रणा कार्यरत होते. लसीमुळे होणारी जोखीम टाळली जाते, म्हणून
प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा