शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

भारतातील ऐतिहासिक ठिकाणे

हवा महल – जयपूर (राजस्थान) 




भारत प्राचीन संस्कृतींचे जतन करणारा पैकी एक देश आहे . क्षेत्रफळाच्या बाबतीत हा जगातील 7वा आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या सर्व बाबतीत या देशाने जगाला मोठा वारसा दिला आहे. हा उष्णकटिबंधीय देश विविध प्रकारचे हवामान अनुभवतो. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशातील ऐतिहासिक ठिकाणे आहेत. भारत जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. इथली संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. शांतता शोधण्यासाठी पर्यटकही येथे येतात. खूप सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. भारत हे विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून झपाट्याने उदयास येत आहे ही अभिमानाची बाब आहे. दरवर्षी जगभरातून पर्यटक येथे येतात आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आणि विविधतेचा आनंद घेतात. कधी तो सण असतो, तर कधी उत्सव असतो. भारतातील लोकांची मैत्रीपूर्ण वृत्तीही पर्यटकांना आकर्षित करते. काही निवडक ऐतिहासिक ठिकाणांची माहिती घेणार आहोत. कुटुंब किंवा जोडीदारासह येथे भेट देणे देखील शक्य आहे. भारतातील काही सर्वात सुंदर ऐतिहासिक ठिकाणांवर एक नजर टाकूया.


1)     हवा महल – जयपु (राजस्थान)

       दिल्ली पासून ३०० की.मी.अंतरावर हवा महल हे भारतातील राजस्थान ची राजधानी जयपूर या ठिकाणी आहे.या सिटीला पिंक सिटी असे हि म्हणतात.कारण या ठिकाणी बांधण्यात आलेल्या वास्तू ह्या गुलाबी रंगाच्या वाळू पासून बनलेल्या आहेत.हवा महल हा एक प्रकारचा भलामोठा राजवाडा सिटी पॅलेस, जयपूरच्या काठावर १७९९ मध्ये महाराजा सवाई प्रतापसिंग यांनी  खेत्री महलच्या आकर्षणामुळे व राजघराण्यातील महिलांच्या सुरक्षित व त्यांच्यावर देखरेख ठेवण्या करीता व महिलांना बाहेर न जाता याच महालामधून रस्त्यावरील सन, उत्सवाचा आनंद पहाता यावा, दिवसांचे लोकांचे येणे जाणे दिसावे या करीता बाधण्यात आला.राजस्थान मध्ये महिला ह्या पडद्यात राहत असल्यामुळे त्याच पमाणे या प्रदेशात उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांनी घराण्यातील महिलाना अशा वातावरणात थंड हवा मिळावी हा त्यामागील उद्देश असावा.

सदर महल हा लाल व गुलाबी वाळूच्या खडकापासून बांधण्यात आलेला आहे.याचे बांधकाम लालचंद उस्ताद यांनी कृष्ण्पदाच्या मुहूर्तावर पूर्ण केलेला आहे.

महाराजा सवाई प्रतापसिंग हे श्रीकृष्णाचे अतिशय भक्त होते,हिंदू देव देवतांच्या आठवणी रुपी त्यांनी हा हवा महल बाधण्यात आल्याचे दिसते.

या राजवाड्याचे वैशिष्ट्ये – हा महाल बांधताना याचा आकार हा आपल्याला श्रीकृष्णाच्या मुकुटा प्रमाणे दिसतो, राजमहल हा पाच माजली आहे, रत्नांपासून सदर महालाची सजावट केलेली आहे म्हणून याला रत्न महाल म्हणतात यावर पाच माजले आहेत. त्यातील पहिला मजला शरद मंदिर , दुसरा मजला रत्न मंदिर, तिसरा मजला विचित्र मंदिर चवथा मजला प्रकाश मंदिर व पाचवा मजला हवा मंदिर या नावाने ओळखला जातो.या महालाला दोन प्रवेश द्वार आहेत.त्यांची नावे पहिला दरवाजा आनंदपोल व दुसरा दरवाजा चांदपोल असे आहेत. वास्तूचे बांधकाम व त्यात वापरलेली शैली हि मुगल व राजपूत स्थापत्यविशारद यांच्या बनावटीची आहे. या महालाची उंची १५ मीटर मधमाश्यांच्या पोळा प्रमाणे जटील व गुंता गुंतीचे आहे.त्यात ९५३ खिडक्या आहेत त्या सुद्धा बाहेरून थंडगार व भरपूर प्रमाणात हवा येईल अशा बनविण्यात आलेल्या आहेत. बाहेरून हा ऐतिहासिक महाल असा वाटतो की हे राजवाड्याचे प्रवेश मार्ग म्हणजे पुढील भाग आहे कारण राजवाडा बांधणाऱ्यांची कला आहे.


1 टिप्पणी:

प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार- Pollution and Types of Pollution

                  प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार   प्रस्तावना – प्रदूषण म्हणजे   जीवन   नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक...